शेतकरी मी ShetkariMi.Com
हवामान खात्याने दर्शवल्यानुसार महाराष्ट्रात काही जिल्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता तर 3 जिल्ह्यांत उष्णतेची लाट
राज्यात तापमानाने उच्चांक गाठला असून उष्णाघातामुळे व कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे
राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊस काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे
दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
6 April पासून पुढील 2, 3 दिवस विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे
हवामान खात्यानुसार, राज्यातील काही भागांत जसे बुलढाणा, अकोला आणि अमरावती या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे
हवामान खात्यानुसार 7 एप्रिल रोजी सुद्धा बुलढाणा, अकोला औरंगाबाद, जालना, बीड, जळगाव आणि अमरावतीत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे